सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथील माता भगवती गोशाळा शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत


 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
     दि.०१महाराष्ट्रात जनावरे व पशुपालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय ही काही जण करत असतात. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती तर होतेच त्याबरोबरच शेती कसण्यासाठी लागणारे बैल ही उपलब्ध होतात.
          परंतु सध्या शेतीमध्ये होत चाललेल्या आधुनिकीकरणामुळे, मनुष्यबळाच्या अभावामुळे, शासनाचे पशुपालका विषयी असणारे उदासीन धोरण अशा अनेक समस्यांमुळे जनावरे व पशुपालकांची संख्या कमी होऊन ग्रामीण भागातून हि गोठ्यातील गाय नाहीशी झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही गो पालणाचे काम मंठा शहरात रेणुका देवी परिसरामध्ये दोन ध्येयवेड्या तरुणाने महेश सराफ व संतोष तिवारी यांनी शासनाची कुठलीही मदतीची अपेक्षा न ठेवता गेल्या दहा वर्षांपासून स्वखर्चाने माता भगवती गोशाळा अवघ्या पाच गाईपासून सुरवात केली. आज घडीला जवळपास 125 गाई आहेत. काही गाई पाळणारे व्यक्ती आजारी, अपंगत्व आलेल्या, म्हाताऱ्या गाई, या गो शाळेमध्ये हक्काने आणून घालतात.शहरातील व परिसरातील काही दानशूर व्यक्ती सामाजिक जाणीवेतून आर्थिक हातभार लावतात परंतु सध्याची चाऱ्याची कमतरता,त्यांची वाढती किंमत व पाण्याची कायमची सोय करणे, व देखरेखी साठी मनुष्य बळा ची आवश्यकता, गाईना कायमस्वरूपी निवांऱ्याची गरज,वैद्यकीय उपचार,अशा अनेक समस्यामुळे मिळत असलेली मदत हि कमी पडत असून शासनानी व सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत करून हातभार लावावा.अशी मागणी माता भगवती गोशाळेच्या वतीने करण्यात येत आहे.


 चौकट
 माता भगवती गोशाळेचा माध्यमातून शासनाला वेळोवेळी मदतीची मागणी करून पाठपुरावा केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा खंत महेश सराफ व संतोष तिवारी यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत