सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पॅसेंजर तसेच लोकल रेल्वे गाड्यांचे ग्रामीण स्टेशनचे थांबे पूर्ववत करा.....लालबावटा

परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे
कोरोणाच्या नंतर नांदेड विभागातील पूर्ववत चालू असलेल्या रेल्वेगाड्या काही बंद तर काहींना एक्सप्रेस केले आहे त्यामुळे ग्रामीण स्टेशन वरील थांबे बंद झाले आहेत तसेच गाड्या एक्सप्रेस केल्यामुळे त्यांचे तिकिटाचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशांना जालना औरंगाबाद कडे किंवा परभणीकडे जावयाचे असल्यास त्यांना परतुर किंवा सेलू सारख्या स्टेशन कडे खाजगी वाहनाने यावे लागते मगच प्रवास करता येतो त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे कोरोणाच्या महामारी नंतर रेल्वे विभागाने जनतेला सेवा देणे अपेक्षित होते परंतु रेल्वेने या गाड्यांचे थांबे बंद करून व तिकीट दरात वाढ करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे तसेच ग्रामीण गरीब जनतेला रीझर्वेशन करता येत नसल्यामुळे त्यांना अत्यंत मानसिक त्रास होत आहे. हैदराबाद- औरंगाबाद, निजामाबाद-पुणे,मन माड-काचिगुडा या पॅसेंजर गाड्या पूर्ववत करून सातोना खुर्द, उस्मानपुर, पारडगाव, कोडी,सारवाडी, येथे थांबा देऊन ग्रामीण विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर,कामगार यांना सहकार्य करावे गंभीर आजार, गरोदर महिला, लहान मुले असलेल्या महिलांना मोफत सुविधा सुरू कराव्यात, विद्यार्थी व वृद्ध यांना प्रवास मोफत करावा, रेल्वे मधील रोजगाराचे कंत्राटीकरण बंद करावे, रेल्वे मधील कंत्राटी कामगारांना कायम करावे अशा विविध मागण्याचे निवेदन लाल बावटा चे महाराष्ट्र अध्यक्ष कॉम्रेड मारुती खंदारे व जालना जिल्हा अध्यक्षा सरिता खंदारे यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रवाशांच्या व मजूरांच्या उपस्थितीत सातोना खुर्द रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक कौशल कुमार यादव यांना देण्यात आले या निवेदनावर कॉम्रेड रवी भदर्गे, भगवान काळे, स.अमेर, शेख अफ्रिज, सीता अकात, रामा वाव्हळ, मनीषा वाव्हळ यांच्या सह्या आहेत यावेळी रेल्वेचा व परतूर पोलिस स्टेशनचा प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त उपस्थित होता या बंदोबस्तासाठी जालनाचे रेल्वे इंस्पेक्टर नरनाराम,यम् राजमल्लू,राजेश उबाळे, रेल्वे गुप्तचर विभागाचे शेख अजीज अहेमद, साहेबराव कांबळे, दिलीप लोणारे विजय बोराडे, राहुल गायकवाड,कैलास वाघ, सोनाली मुंडे,पांडुरंग चव्हाण तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे एपीआय सचिन पुंडगे,नितीन कोकणे, संजय वैद्य,आबासाहेब बनसोडे व महिला पोलिस कॉन्स्टेबल संगीतम आणि उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत