सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त मंठा येथे अभिवादन..!


 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
       येथे (ता.१८) सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी शाळेत न जाता बिनभिंतीच्या शाळेतच शिक्षण घेऊन त्यांनी ३५ कांदिबऱ्या,१९ कथासंग्रह,१३ लोकनाट्य, १० पोवाडे, १ नाटक, १ प्रवासवर्णन अशी ७० पुस्तकांच्यावर साहित्य लिहून त्यांचे काही साहित्य अनेक भाषेत भाषांतरीत झाले आहे. अण्णाभाऊ हे, सुरुवातीला कम्युनिस्ट विचारसरणीचे होते नंतर त्यांनी आंबेडकरी विचारधारा अंगिकारली. 
त्यांच्या वारणेचा वाघ, वैजंता, फकिरा, आवडी, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, अलगुज,चित्रा या कादंबऱ्यावर चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. १६ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा येथे अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ.प्रतापसिंह चाटसे, अरामकिसन कांबळे, नगरसेवक राजेश खंदारे, अरुणभाऊ वाघमारे, बाळासाहेब वांजोळकर,ॲड सिद्धार्थ अवसरमोल, प्रकाश घुले, शरदभाऊ मोरे, मारुती खनपटे, राज खनपटे, पिराजी पवळे, जय खंदारे, भीमराव वाघ, विलास बनसोडे, नंदू खनपटे, अजय गायकवाड, सोपान वाघ, लखन कांबळे यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत