सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रहारच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतुर येथे ग्रामीण रुग्णालय येथे प्रहार संघटनेच्या वतीने विविध निवेदन आंदोलन केले परतूर येथे ग्रामीण रुग्णालयात अपंगासाठी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी याकरिता दोन वर्षापासून संघर्ष चालू होता तरी या मागणीला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल  यांनी अपंग तपासणी व प्रमाणपत्र या मागणीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परतूर येथे दुसरा शनिवार व चौथा शनिवार अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी अपंग तपासणी व प्रमाणपत्र मान्यता दिली यामध्ये अस्थिव्यंग व अल्पदृष्टी या तपासणीला मान्यता दिली यामुळे तालुक्यातील अपंग बांधवांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही यामुळे अपंग बांधवांचे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरता मोठे आर्थिक व वेळही जाणार नाही याबद्दल अशोक तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ ज्ञानदेव नवल  तसेच जिल्हा रुग्णालयाचे तज्ञ डॉ भगत  यांचे आभार मानले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत