सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जिल्हाच्या विकाससाठी लोणीकर साहेबांना मंञी पद द्यावे- विष्णु मचाले

परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
तालुक्याच्या व जिल्हाच्या विकासासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोनीकर साहेब यांना पुन्हा संधी दयावी आशी मागणी संपुर्ण जिल्हातुन होत आहे लोणिकर साहेबांनी‌ फडणवीस साहेबांच्या काळात तालुक्याची जी काया पालट केली त्या अनुशंगाने येणार्या काळात हि अनेक योजनांच्या माध्यमातुंन व फंडातुन विकासत्मक कामे, मददार संघात होतील , आशा आशेनी हि मागणी केली जात आहे लोणीकर साहेबांची पक्ष निष्ठा व आक्रमक भुमिका पाहता त्यांना मंञी पद देण्यात यावी आशी मत व्यक्त होत आहे साहेबांनी गेल्या 5 वर्ष मंञी आसतांना महाराष्ट्रात वाटरग्रिड , जलयुक्त शिवार , तर तालुक्यात गाव तेथे रस्ता, फिल्टर पाणी, सभामंडप, स्मशान भुमी, 33 केव्हि , दलित बांधवांन साठी बोध्द विहार, शहरात, कॉंक्रिट रस्ते, नाट्यगृह, उढ्ढाण पुल आरोग्य विषय प्रश्न , शासकिय इमारतीला फंड असे अनेक योजना साहेबांनी आनल्या आहेत व मंञी पद पुन्हा दिल्यास नक्कीच आजुन विकासत्मक कामे होतील....

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत