सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सय्यद वसीम व मित्र मंडळाच्या वतीने पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार....


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे

अनेक वेळा चांगले कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव झालेले तसे कमी पाहण्यात येथे  याला अपवाद आहे शहरातील एआईएमआयएम चे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांच्या वतीने शहराची साफसफाई करणाऱ्या पालिका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
झाले असे की मागील आठवड्यात आषाढी एकादशि व बकरी ईद हे महत्वाचे सण साजरे करण्यात आले या सणाच्या काळात शहरातील विविध भागांतील स्वच्छता करून आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून देणाऱ्या पालिका कर्मचारी यांनी मुख्याधिकारी सुधीर गवळी व स्वच्छता अभियंता प्रमोद घाटेकर ,निरीक्षक रवी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई केली 
याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आला होता याबाबतची दखल घेत सय्यद वसीम व त्यांच्या मित्रमंडळी यांनी दिनांक 17 जुलै रोजी पालिकेत जाऊन सफाई कामगार यांचा सत्कार केला 
यावेळी सय्यद रहेमान,इसा अन्सारी,नईम भाई,शेख हसन,रज्जाक कुरेशी,नजीब काजी,शेख आसेफ,अनिल पारीख यांच्यासह पालिकेतील सफाई कामगार व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत