सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

कोरेगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


परतूर -- प्रतिनिधी हनुमंत दंवडे
तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी सोनाजी तुकाराम खरात वय 50 वर्ष यांनी दि 3 जुलै रोजी रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतात झाडाला गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
शेतकरी सोनाजी खरात याना कोरेगाव येथे तीन एकर जमीन आहे.  पंधरा दिवसापूर्वी बी बियाणेसाठी पैशाची आवश्यकता असल्याने बैलजोडी विक्री केली. त्यातून आलेल्या पैशातून बी बियाणे खरेदी केली तर काही खाजगी व्यवहार केले. शेतात पुढील खर्च पैसे नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ने आर्थिक विवंचनेत होते. तसेच बँकेचे दोन लाख रुपये घेतलेले कर्ज थकले होते.  कर्ज थकले असल्याने कर्ज कसे फिटनार निसर्गाचा लहरीपणा असल्याने कर्जबाजारीपणा व आर्थिक अडचणींमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.  या घटनेची नोंद परतूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

या बाबत पुढील तपास पोलीस नाईक नितीन कोकणे हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू, असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत