सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेनेमुळे मिटला वडारवाडीचा विजेचा प्रश्न सेनेचे उपशहरप्रमुख दीपक हिवाळे यांचा पुढाकार नागरिकांनी व्यक्त केले समाधान


 

 परतूर - प्रतीनीधी हनुमंत दंवडे
 नगरपालिका हद्दीतील वडारवाडी पारडगाव रोड ,नागसेन नगर येथे गेल्या २५ ते ३० वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहे, त्यांची पक्के घरे असून नगर पालिकेत घरांच्या नोंदी आहेत प्स्थापित राजकारण्यांनी निवडणुकी पुरताच येथील नागरीकांचा आता वापर केला आहे.परंतू तेथील नागरी सुविधेवर सपेशल दुर्लक्ष करीत आलेले आहेत. 
       येथे नगर पालिकेने कुठल्याच सुविधा पुरविलेल्या दिसत नाहीत.मागील २५ ते ३० वर्षापासून येथील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही, थ्री फेज लाईट नाही.थ्री फेज लाईट नसल्यामुळे येथील पाण्याचे बोर शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत.येथील महिला दोन ते तीन किलो मीटर लांबून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.व पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख दीपक हिवाळे यांनी जिल्हा संघटक मोहन अग्रवाल व तालुकाप्रमुख अशोकराव आघाव यांच्या मार्गदर्शना खाली वडारवाडी व नागसेन नगर येथील नागरिकांशी संवाद साधून व एमएसईबीचे दरेकर यांच्या सहकार्याने येथील नागरिकांना १९,७७५२९ (एकोणीस लाख सत्यात्तर हजार पाचशे एकोणतिस) रुपयाचे इस्टीमेट असून यात ३० विद्युत खांब व १०० केवीचे ट्रांसफार्मर शिवसेनेने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर काम एन एस सी योजने अंतर्गत मंजूर झालेले आहे. अगदी काही थोड्या दिवसातच या कामासही सुरुवात होईल असे एमएसईबीचे अभियंता दरेकर यांनी सांगितले. तसेच वडरवाडी पारडगाव रोड व नागसेन नगर येथील नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानून मागील २५ ते ३० वर्षाचा विद्युत लाईटचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत