सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जालना जिल्ह्यात टवाळखोरांना आवर घाला, मनसे विद्यार्थी सेनेची मागणी



जालना: प्रतिनिधी समाधान खरात 
       जुन महिन्यात राज्यातील काॅलेज महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थी तरुणीं या काॅलेज व महाविद्यालयात रस्त्याने पायी तर काही विद्यार्थींनी सायकल, स्कुटी, बसने जाणं येणं करत आसतात. तसेच जालना शहरात व जिल्ह्यात काॅलेज, विद्यालयाबाहेर टवाळखोरांची झुंबड ऊडतांना दिसुन येत आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. 
     या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे जालना पोलीस अधिक्षक डाॅ.अक्षय शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जालना जिल्हा व शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा आशी मागणी केली आहे. तसेट टवाळखोर व गुन्हेगार वृत्तीच्या विद्यार्थ्यांना काॅलेज महाविद्यालयात प्रवेश देऊ नये. आसी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी सुरवातीपासुनच जालना जिल्हा शिक्षण विभागाकडे लाऊन धरली होती. पण काॅलेज, व महाविद्यालय व्यवस्थापकांवर दबाव टाकून व दहशत निर्माण करुन टवाळखोरांनी प्रवेश मिळवला आसल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. टवाळखोर हे शिक्षणसाठी काॅलेज मध्ये येत नसतात. तर? धिंगा मस्ती करण्यासाठीच येत असुन जालना जिल्ह्यातील व शहरातील मुलींना मनमोकळे शिक्षण घेता यावे. आसे सिद्धेश्वर काकडे यांनी जालना पोलिस अधिक्षक यांच्याकडे ग्रहाणे मांडले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत