सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

2017 व 2018 मध्ये अहिल्याबाई सिंचन विहीर मंजूर करून शासनाची तीन लाख रुपयांची फसवणूक.... परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषण


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील मौजे वलखेड तालुका परतूर या ठिकाणी सिंचन विहिरीचा गट क्रमांक 61 मधील अहिल्याबाई सिंचन विहिरीचा प्रस्ताव सन 2017 व 2018 मध्ये मंजूर करून शासनाची तब्बल तीन लक्ष रुपयाची फसवणूक करून भ्रष्टाचार करण्यात आला आणि या भ्रष्टाचाराची योग्य दिशेने योग्य मार्गाने चौकशी होण्यासाठी गंगाधर विठ्ठलराव सुरुंग यांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर यांना निवेदन देण्यात आले होते.
        पण या निवेदनावरती कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वरिष्ठाकडे सुद्धा वेळोवेळी त्यांनी निवेदन पाठवले आणि पंचायत समितीने असे सांगितले की या कामाच्या संदर्भामध्ये संचिका ज्या आहेत त्या संचिका आमच्याकडे उपलब्ध नाहीत संचिका पूर्णच्या पूर्ण गहाळ करण्याचे काम येथील अधिकाऱ्यांनी केले होते. याची योग्य चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा विठ्ठल गंगाधरराव सुरुंग यांनी घेतलेला आहे. जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने उचललेले विहिरीचे बिल शासनात परत केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत