सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप

परतूर प्रतीनीधी हनुमंत दवंडे 
      परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप दि 24 रोजी संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते तर गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. 
      परतूर येथील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पालकांची उपस्थिती पण लक्षणीय होती. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी सांगितले की,विद्यार्थी यांचा शैक्षणिक विकास व्हावा या साठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. असे ते म्हणाले यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मानवविकास चे तालुका समन्वयक श्री काठमोरे, श्रीमती स्मिता रोडगे,विजय राखे, अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,श्याम कबाडी, रामराव घुगे,सचिन कांगने,कैलास खंदारे,अनिल काळे,बळीराम नवल,रमेश निर्वळ, सुभाष बरकुले, राजू वडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत