सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अरुण धुमाळ यांच्या मोहन अग्रवाल यांच्या उपस्थीत शिंदे गटात प्रवेश

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
आज मोहन अग्रवाल यांच्या निवासस्थानी परतुर तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण धुमाळ यांचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  यांच्या गटात मोहन अग्रवाल व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला अरुण धुमाळ हे शेवगा येथील ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक असून गेल्या 37 वर्षापासून परतूर तालुक्यात शिवसेनेचे काम करीत आहे त्यांनी स्वर्गीय नाशिकराव मुळे व स्वर्गीय सुधाकररावजी खवणे यांच्यासोबत शिवसेना वाढविण्यासाठी काम केले आहे  यांच्या सोबत येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास वटाणे व युवासेनेचे मंगेश वाटाणे यांनीही मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गाटात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी वलखेडचे उपसरपंच भगवान सुरूंग उपशहर प्रमुख सतीश हजारे बाबासाहेब चिखले दत्ता अंभुरे यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत