सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समाजाच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र समाजाचे काम करणार...प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य


(बीड प्रतिनिधी)
       आज बीड येथे शासकीय विश्रामगृह याठिकाणी धनगर समाज महाराष्ट्र राज्य व बीड जिल्हा यांच्या वतीने मा.प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक घेण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्ष रवींद्रजी गाडेकर (माजी सरपंच घुमरा पारगाव) प्रमुख पाहुणे सुदर्शन दादा भोंडवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उबाळे काका ,नारायण भोंडवे सरपंच डोंमरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.
  या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या अडीअडचणीसाठी धावून जाण्यासाठी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवकांनी व समाज बांधवांनी मला सहकार्य करावे मला साथ द्यावी समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजाच्या हितासाठी अन्यायाच्या विरूद्ध लढण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे असे बोलताना सांगितले.
   यामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला व समाजातील युवकांकडे काही जबाबदारी देण्यात आल्या.
   यावेळी भारत गाडे,शितलताई मतकर जिल्हाध्यक्ष,अरुण काकडे ,अविनाश भरणे, बाजीराव शिंदे,दत्ता गाडेकर, संदिप गाडेकर, नवनाथ डफळ, ईश्वर भोंडवे,दादा जायभाये, नितीन निर्मळ, ओंकार काळे, गुरव सर,नितेश गांगुर्डे, अक्षय खोटे,यश भोसले, प्रशांत काकडे,करण भोंडवे, तांबे भैय्या ,आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत