सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दिव्यांगांना रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना द्यावा.- अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 दिनांक 4 /8 /2022 रोजी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी साहेब जालना यांना जिल्ह्यातील दिव्यांगांना रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना देण्यात यावा या करिता निवेदन देण्यात आले आहे.
       या निवेदनामध्ये जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त रास्तभाव दुकाने व केरोसीन याचे परवाने दिलेले आहेत तसेच जे रद्द परवाने झालेले आहेत व जे परवानाधारक मयत झालेले आहेत व नवीन रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना दिव्यांग बांधवांना देण्यात यावा याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांग बांधवांना जे शासकीय सेवेमध्ये नाहीत उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा बेरोजगार दिव्यांगाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी जिल्ह्यामध्ये जे परवाने रद्द झालेले आहेत किंवा एकापेक्षा जास्त परवाने दिलेले आहेत व जे परवानाधारक मयत झाले आहेत. तसेच दिव्यांग बांधवांना नोकरीही नाही आणि रोजगारही नाही अशा दिव्यांग बांधवांना तसेच नवीन रास्तभाव दुकाने व केरोसीनचे परवाने दिव्यांग बांधवांना देण्यात यावे जेणेकरून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध रोजगार उपलब्ध होईल याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा. अशी विनंती निवेदनामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत