सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

गेले ते कावळे, सच्चा मावळा सेनेचाच- दत्ता पाटील सुरुंग

परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे

परतूर शहर आणि तालुक्यात शिवसेनेला खिंडार अशा आशयाच्या बातम्या येत असून विविध पक्षात फिरून आणखी एखाद्या पक्षात जाणार्‍याच्या इतर पक्षातील प्रवेशामुळे शिवसेनेला खिंडार पडणे हे हास्यास्पद असून सच्चा मावळा आजही शिवसेनेत असून उद्या तो कायम राहिल असा विश्वास शिवसेनेचे परतूर शहरप्रमुख दत्ता पाटील सुरुंग यांनी व्यक्त केला.
राज्यात शिवसेना फुटीबाबत नेहमीच चर्चा होते याच पद्धतीने परतूर शहरात शिवसेनेला खिंडार अशी बातमी वृत्तपत्र व समाज माध्यमातून सध्या फिरतांना पहायला मिळते. जे इतर पक्षातून शिवसेनेत आले त्यांच्या जाण्याने शिवसेनेला खिंडार पडणे अत्यंत हास्यास्पद असल्याचे दत्ता पाटील सुरुंग म्हणाले. शिवसेना हा अभेद्य असा किल्ला असून काही कावळे सत्तेसाठी उडाले असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे सर्व मावळे शिवसेनेत आहोत ना मग खिंडार कसे पडेल असा सवालही सुरुंग यांनी करून झालेल्या घटनेचा खरपूस समाचार घेतला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत