सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समर्थ रामदास स्वामींच्या जन्म गावातून चोरीस गेलेल्या ऐतिहासिक राम सीता लक्ष्मणाच्या मूर्ती चोरणारास तात्काळ अटक करा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांनी भ्रमणध्वनी वरून पोलीस निरीक्षक व मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत घटने संदर्भात पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश


प्रतिनिधी समाधान खरात 
इ स पंधराशे साली समर्थ रामदास स्वामींच्या जांब समर्थ गावामध्ये स्थापित करण्यात आलेल्या राम सीता लक्ष्मणाच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती दिनांक 21 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र देत या ऐतिहासिक मुर्त्यांच्या चोरी संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधित चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे       याबाबतचे अधिकृत असे की जांब समर्थ तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील मूर्ती चोरीची घटना समजताच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलत चोरांना जेरबंद करावे असे सांगितले त्याचबरोबर मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करत घडलेल्या घटने संदर्भात इतिवृत्तांत जाणून घेतला
 समर्थ रामदास स्वामी हे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रगण्य असलेले संत असून त्यांच्या गावातील इ स 1500 मध्ये स्थापित केलेल्या मूर्ती चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे राज्यभरातून व जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकातून संताप व्यक्त केला जात असून यासंदर्भामध्ये तात्काळ कारवाई होणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
ज्या रामदास स्वामींनी महाराष्ट्र राज्यातील गावा गावामध्ये श्री हनुमानाचे मंदिर स्थापित केले अशा महान विभूतीच्या गावातील मंदिरामध्ये असलेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती चोरी जाणे ही गोष्ट अतिशय वेदनादायक असून या घटनेमुळे सर्वत्र चोरट्यांच्या विरोधामध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत