सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वाई येथे जनावराचे मोफत लसीकरण

मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
  वाई ग्रामपंचायत च्या वतीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लंपी साथरोग प्रतिबंधक लस देण्यात आली या मोहिमेचा समारंभ वाई गावचे सरपंच परमेश्वर उबाळे तसेच उपसरपंच सुनील दत्तात्रय ठाकरे तसेच गावचे मानकरी नारायण पाटील उबाळे यावेळी हजर होते
     सुमारे चारशे ते साडेचारशे जनावरांना या मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली वाई गावातील नागरिक शेतीसह मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करतात सद्यस्थितीला लंबी हा सात रोग झपाट्याने वाढत असल्याने शेतकरी व पशुधन पालक चिंतेत आहेत शासनाकडून लपी प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने सरपंच परमेश्वर उबाळे तसेच पत्रकार रामेश्वर उबाळे यांनी पुढाकार घेऊन खाजगी लस उपलब्ध करून दिली.
त्यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण सर तसेच डॉक्टर मानमोडे सर तसेच त्यांची पूर्ण टीम वाई गावात दाखल झाली तसेच सरपंच यांनी जनजागृती करताना शेतकऱ्यांनी जनावरांचे गोटे फवारून घ्यावे लिंबाचा पाला दिवस माळवतेच्या वेळी लिंबाच्या पानाचा धूर करावा असे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत