सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेना मंठा शिंदे गट तालुकाप्रमुखपदी उदय बोराडे यांची नियुक्ती


 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
   दि.०१ शिवसेनेच्या मंठा तालुकाप्रमुखपदी शिंदे गटाचे उदय प्रल्हादराव बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परतूर येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, पंडितराव भूतेकर, प्रल्हादराव बोराडे, यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. 
     यावेळी मंठा शिवसेना शहर प्रमुख पदी गणेश रामराव बोराडे यांची निवड करण्यात आली. उदय बोराडे व गणेश बोराडे यांच्यासोबत तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला मंठा तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करून गावा गावात शिवसेनेचे कार्य मजबूत करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले प्रत्येक गावात त्यांचे विचार पोचविणार असल्याचे उदय बोराडे यांनी सांगितले.. उदय बोराडे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची खूप आवड आहे त्यांनी 2012 सली शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करून तालुक्यात शाखाचां माध्यमातून सर्व अठरा पगड जातींच्या सर्व बांधवांना सोबत घेऊन सामाजिक कार्यात गेल्या 10 वर्षात तालुक्यात खूप कार्य केलेली आहेत व यासमोर ही सर्व शेतकरी बांधव असो सर्व क्षेत्रातील नागरिकांना माय बाप जाणते साठी 24 तास काम करेल.. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत