सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दैठना खुर्द शिवारातील कसूरा नदीवरील पूल गेला वाहून, कसूरा नदीवरील रस्त्यातील पूल उभारण्याची मागणी

 परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
       दैठना खुर्द शिवारातील शेतीकडे कसूरा नदीवरुण जाणारा पूल पावसाने वाहून गेला आहे. नवीन पूल उभरा नसता जलसमाधी घेण्याचा इशारा येथील शेतकर्‍यांनी तहसीलदारकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे की दैठना खुर्द येथील पिंपळगाव रोड ते कुलकर्णी वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावरील कसूरा नदीवरील पूल दि २७ व २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या पावसाने वाहून गेला आहे. कुलकर्णी वस्तीकडे हातडी लघु सिंचन तलावच्या खाली कसूरा नदी जात आहे. या नदी वरील पूल झालेल्या पावसाने नदीला पुरात वाहून गेला असल्याने या भागातील शेतकर्‍यांची शेती असल्याने अनेकांना शेती वहिती करण्यास अडचणी येत आहेत. या रस्त्यावरील पूल तात्काळ निर्माण करावा आमचे शेती मशागत करण्यासाठी जात येत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तात्काळ पूल उभारून रस्ता करावा नसता या पुलावरील पाण्यात जलसमाधी घेण्यात येईल. घडलेल्या घटनेला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. अण्णासाहेब सवने, विलास भदर्गे, भीमराज तयाडे, संदीप शिंदे, अमोल सवने, गणेश कदम, अमर राकूसले, लक्ष्मण मोरे, भगवान सोळंके, यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत