सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रतीक जोशी यांना संस्कृत काव्यशास्त्र विषयात पीएचडी

परभणी प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
        येथील आचार्य वेदशास्त्र पाठशाळेचे विद्यार्थी श्री प्रतीक प्रमोदराव जोशी यांना  दि.१२ऑक्टोबर रोजी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक,नागपूर यांच्यामार्फत पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी संस्कृत काव्यशास्त्र या विषयात पीएचडी करताना "जगन्नाथोत्तराणां प्रमुखकाव्यशास्त्रीय ग्रंथानां समीक्षणात्मकम् अध्ययनम्" या विषयावर आपला प्रबंध मार्गदर्शक डॉ.पराग जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. 
    त्यांना त्यासाठी त्यांचे गुरुजी वेदांतकोविद प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ झाला. भागवतकार असलेल्या प्रतीक जोशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सर्वश्री हभप माधवराव आजेगावकर, प्रमोदशास्त्री कुलकर्णी, नरहरी गुरुजी एरंडेश्वरकर, शंकर आजेगावकर, सर्वोत्तम पाथरीकर, विश्वजीत कुलकर्णी, चंद्रकांत साळेगावकर गजानन खळीकर प्रसाद रोपळेकर विलास कौसडीकर किशोर पुराणिक उपेंद्र दुधगावकर आदींनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत