सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथे नवीन दहा अंगणवाडी देण्याची नरेश कांबळे यांची मागणी

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण                                                     परतूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिव वाढत चालली आहे पण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा येथे खूप कमी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविका यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी करण्याची मागणी होत आहे तसेच शहरातील गरोदर मातांचे प्रमाण वाढत असून सुध्दा त्याप्रमाणात या महिलांना लसीकरण, तसेच इतर संदर्भसेवा मिळत नाहीत व नवजात बालक यांना सुद्धा लसीकरण, पोषक आहार तसेच संदर्भ सेवा पोचवणे अडचणीचे होत आहे. 
   यामुळे पोषक आहाराअभावी नवजात शिशू हे कुपोषित होण्याची शक्यता वाढत आहे. यामूळे आपण या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन परतूर शहराला नवीन दहा अंगणवाडीची मान्यता देऊन अंगणवाडी सेविका व मदतनिस भरती प्रक्रीया करून परतूर शहराची अडचण सोडविण्याची विनंती येथील सामाजिक कार्यकर्ता नरेश रामभाऊ कांबळे यांनी निवेदनाद्वारे आपणास केली आहे, नरेश कांबळे हे कित्येक वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा करत आहेत.
एकात्मिक बाल विकास योजना जालना कार्यालयात श्रीमती गुट्टे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत