सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मराठवाड्यात राहुल गांधींजीची पाऊले काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करणारी-जेथलीया ,देगलूर ते नांदेड मा.आ.सुरेशकुमार जेथलियांनी राहुल गांधी सोबत घेतला भारत जोडो यात्रेत सहभाग


प्रतीनिधी समाधान खरात
      स्वतंत्र चळवळीपासून आजवर केवळ लोकशाहीचा सन्मान करत सामान्यांच्या भावना जोपासणारी काँग्रेस परिवारातील नेते राहुल गांधी यांची पाऊले मराठवाड्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांत जोष, चैतन्य निर्माण झाले असल्याचे गौरवउद्गार मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी काढले. 
       भारत जोडो यात्रा निमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत देगलूर ते नांदेड सभास्थानापर्यंत जेथलिया यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ देशमुख,राजेंद्र राख,कल्याणराव दळे,जालना उपजिल्हाध्यक्ष किसनराव मोरे,प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब खंदारे, माऊली तनपुरे, दिलीप चव्हाण, सादेक जहागीरदार, मंठा तालुकाध्यक्ष निळकंठराव वायाळ, विष्णू चव्हाण,जालना तालुकाध्यक्ष वसंतराव जाधव यांच्या सह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता. या यात्रेत सहभाग नोंदवल्यावर आपल्या प्रतिक्रियेत मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की, देशाच्या जडणघडनीत गांधी परिवाराचे मोठे योगदान असून देशासाठी त्यांच्या परिवातील अनेकांनी प्राणाची आहुती दिली. आमचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत चालताना वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठवाड्यातील काँग्रेसला या यात्रे निमित्त नवचैतन्य मिळाले असून, काँग्रेस कार्यकर्त्यांत वेगळाच उत्साह संचारल्याचे निदर्शनात येत आहे, असे अनेक अनुभव त्यांनी व्यक्त केले. ही यात्रा देशाला नवी दिशा देणारी ठरणार असून, कार्यकर्त्यांनी ही यात्रा मनाशी बांधत पक्ष चळवळ अधिक बळकट करावी असे आहवन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत