सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर मंठा मतदारसंघासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करत परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी खेचून आणून या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत मंठा येथील रेणुका देवी रोड च्या बहु प्रतीक्षित कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे हजारो भाविक भक्तांची देवीच्या दर्शनासाठी जाण्याची सोय होणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून नाबार्ड अंतर्गत लोणी खूप ते बानाची वाडी रस्ताही अनेक ठिकाणी खचून जात असतो त्यामुळे या रस्त्याला ज्या ठिकाणी रस्ता खचलेला असेल त्या ठिकाणी साईड वाल सह या रस्त्याचे सुधारणा करण्यात येणार असल्याचे आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले असून यासाठी 1.5 रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सीआरआयएफ निधीमधून मंठा ते विडोळी पाटोदा रस्त्याची सुधारणा करण्याबरोबरच पाटोदा जवळील पुलाचे बांधकाम करण्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे तर दैठणा जांब समर्थ रस्त्याच्या दुरुस्तीसह पुलाची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या माध्यमातून विकासाला चालना मिळणार असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे पुढे या पत्रकात आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे की राज्यात सत्ता बदल होताच परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये बजेट मधील 50 कोटींच्या कामासह आज घडीला पुन्हा एकदा 17 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे गतिमान सरकार असून जनसामान्यांच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे या पत्रकात लोणीकर यांनी नमूद केले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत