सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

श्री समर्थ विद्यालयात जागतिक सुर्यनमस्कार दिन साजरा.


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
अठ्ठावीस जानेवारी. हा दिवस संपुर्ण जगात जागतिक सुर्यनमस्कार दिन म्हणुन साजरा केल्या जातो. 
शासन निर्देशाप्रमाणे आज श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा [ माव ] या प्रशालेत. मोठ्या ऊत्साहात सुर्यनमस्कार करुन हा दिवस साजरा करण्यात आला. 
सुर्यनमस्कार हा सर्वांगीन व्यायामाचा शास्त्रशुध्द प्रकार असुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज सुर्यनमस्कार घालुन शरीर बळकट व मजबुत करणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले. 
 सुर्य नमस्काराच्या विविध पायर्या विद्यार्थ्यांना सहशिक्षक श्री आबासाहेब गाडेकर व श्री भास्कर कुळकर्णी यांनी समजुन सांगितल्या.
  तत्पुर्वी कार्यक्रमाचे ऊद्घाटन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री प्रभाकर कादे यांचे हस्ते सरस्वती पुजण करुन करण्यात आले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री रोकडे , सातपुते , खवल , जोशी , खरात , वखरे या कर्मचारी बंधुनी परीश्रम केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत