सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील आष्टी व अकोली येथील पांदण रस्त्यांच्या कामाची माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केली पाहणी,पांदण रस्ते पाहून केले समाधान व्यक्त


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
बागायतदार व कोरडवाहू शेतकऱ्यांना, खऱ्या अर्थाने शेतीत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मशागतीसाठी जाणे येणे करणे अतिशय पानंद रस्त्या मध्ये असलेल्या गुडघाभर चिखलामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र आष्टी व अकोली येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून झालेल्या पाणंद रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
    थेट शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी उत्कृष्ट असे म्हणून रस्त्यावरील काम झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पिकणारी अन्नधान्य सोबतच डाळिंब ,मोसंबी ऊस, केळी ,सिताफळ आदी उत्पादित मालांना शेतकऱ्यांना सहज बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे
उस मुख्य पिक आष्टी व परिसरातील शेतकऱ्यांचे असून केवळ, रस्त्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड करता येत नव्हती अनेक फळपिके घेता येत नव्हती अशा परिस्थितीत हे पांदण रस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यांना या पांदण रस्त्याच्या माध्यमातून आपल्या शेतातील फळबाग उसाचे क्षेत्र वाढवता येणार असल्याचे यावेळी आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले
या पांदण रस्त्यामुळे यांत्रिकीकरणाद्वारे शेती करणे ही अतिशय सुलभ झाले असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार असून झालेल्या पांदन रस्त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी रामप्रसाद थोरात तुकाराम जी सोळंके बाबाराव जी थोरात सरपंच मधुकरराव मोरे अमोल जोशी बबलू सातपुते श्रीधर गांजाळे अनंतराव आगलावे डॉ नारायणराव सरकटे बापूराव सोळंके अंकुशराव चव्हाण दामोदर सोळंके आसिफ कच्ची राजेभाऊ तौर, अर्जुन थोरात मुजीब भाई माऊली सोळंके पंजाब देशमुख भुजंग गाते रवी देशमुख रामराव सोळंके संजय सोळंके अशोक शेळके बाबासाहेब शिंदे प्रकाश नंदुरकर हनुमान इंगळे परसराम नरसाळेउमेश सोळंके, रमेश थोरात, मारोती थोरात,अल्लताब कुरेशी विठ्ठल सोळंके नागेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत