सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेतकऱ्यांच्या कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा व विज बिल माफ करण्यात यावे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतुर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन


 परतुर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र भर कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा याकरता महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल  महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे 
कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासनाचा हमीभाव ६ हजार असल्यामुळे खाजगी व्यापारी सुध्दा ७ ते ८ हजारामध्ये कापूस खरेदी करत आहेत. हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. अजुन शेतकऱ्यांचा ७०-८० टक्के कापुस घरामध्ये पडून आहे. हा कापुस शेतकऱ्यांना विकणे खुप गरजेचे असुन त्यांच्या मुलां-मुलींचे लग्न शिक्षण व दैनंदीन गरजा भागवण्यासाठी कापुस विकणे गरजेचे आहे.
योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे व इतर शेतीशी संबंधीत प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कापसाला हमीभाव १२ हजार रूपये करावा व शासनाने स्वतः कापूस खरेदी करावा.
महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बीलाच्या युनिट मध्ये वाढ न करता इतर आकारामध्ये भरमसाठ वाढ केलेली असुन त्यामुळे ती दिसुन येत नाही. केलेली वीज बिलामधील वाढ ही नागरीकांना परवडणारी नसुन ती संपुर्ण जनतेची दिशाभुल करणारी आहे. ती अतिरीक्त वाढ सर्व सामान्य जनतेवर हकनाक पडत आहे ती अतिरीक्त वाढ तात्काळ रद्द करावी. असा इशारा वंचित बहुजन आघाडी परतुर तालुका अध्यक्ष रवी भदर्गे रोहन वाघमारे बाबासाहेब शिंदे सुभाष खरात विजय खरात राहुल नाटकर आकाश मुंडे सदाभाऊ शिरसाठ प्रवीण मोरे यांच्या वतीने देण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत