सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सामाजिक बांधिलकी म्हणून एक दिवस समाजासाठी खर्च करा:- निर्धास राठोड


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
  क्रांतिकारी संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास भूमिपूजन समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा असंख्य लोकप्रतिनिधी व अध्यात्माशी निगडित मान्यवर पोहरादेवी ला येत असून बंजारा समाज बांधव आणि डॉ रामराव बापूंना मानणाऱ्या समस्त नागरिकांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ला येण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.
     संपूर्ण मानव जातीला भूतदया,निसर्गातमानवता,प्रति आदराचीभावनासातत्याने जपण्याचीशिकवणूक दिलेल्या संतसेवालालमहाराज तीर्थभूमीआणि सती सामकी मातादेवस्थान उमरी गड पायाभूतविकासाच्याभूमिपूजनासाठी
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत शासनातील अनेक मान्यवर आणि अध्यात्म क्षेत्रातील असंख्य गणमान्य उपस्थित राहणार असल्याने समस्त समाज बांधव भगिनींनी या सोनेरी क्षणाचे भागीदार होण्यासाठी येथे 12 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत