सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा कार्य अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांना सादर

 
परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण 

आर्ट ऑफ लिव्हीग चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूर येथे गुरुवारी शेतकरी मेळावा संपन्न झाला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सावंत, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर ,माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर व युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अभिमन्यु खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी त्यांच्या कार्याचा अहवाल पुस्तीका मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सादर केला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्य अहवाल पुस्तिका पाहून जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचे कौतुक केले व केलेल्या विकास कामाची व अग्रवाल यांच्या हातून घडलेल्या सामाजिक उपक्रमाची स्तुती करून अग्रवाल यांना पुढील कामास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जालना जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत