सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पोहारादेवी तीर्थक्षेत्र विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे बंजारा बांधवांनी साक्षीदार व्हावे -सामाजिक कार्यकर्ते मोहन आडे

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
 बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोरागड व उमरी येथे येत्या १२ फेब्रुवारीला होणाऱ्या संत सेवालाल महाराज अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वज रोहन आणि ५९३ कोटी रुपयेची तीर्थक्षेत्र विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे बंजारा बांधवांनी साक्षीदार व्हावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते मोहन आडे यांनी केले.
जालना जिल्ह्यातील परतूर मंठा घनसावंगी अंबड,जालना तीन मतदार संघात बंजारा समाज जास्ततीन मतदार संघात बजारा समाज जास्त प्रमाणात वास्तव्यास आहे. मोहन आडे हे तांडो तांडा जाऊन प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक भेटून येत्या १२ फेब्रुवारीला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे होणाऱ्या सेवाध्वज कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान करत आहे.

या भव्य समारंभ कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, कॅबिनेट मंत्री नामदार संजय राठोड यांच्यासह मंत्रीगण, आमदार, खासदार आणिसमाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती उपस्थित राहून, संत सेवालाल महाराजाचे दर्शन घ्यावे व या कार्यक्रमात लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे.

आपल्या बंजारा समाजाची एकता व संघटन शक्ती सरकार समोर दाखवून समाजाच्या विविध समस्या प्रश्न व विकास सोडविण्याकरिता माता-भगिनीसह यावे असे आव्हान मोहन आडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत