सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अखेर त्या वानरास पकडण्यात वन विभागाला यश

  परतुर प्रतिनिधी संतोष शर्मा
   परतुर शहरातील मोंढा भागात गेल्या सात-आठ दिवसापासून एका पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घालून साठे नगर या भागातील चार नागरिकांना कडाडून चावा घेतला होता त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागले होते या संदर्भात परतुर शहरातील साठे नगर भागातील नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांनी वन विभागाला एका निवेदनाद्वारे मागणी केली होती की पिसाळलेल्या वानरास त्वरित पकडावे नसता तो पिसाळलेला वानर अजूनही नागरिकांना चावा घेऊ शकतो यामध्ये चावा घेतलेले नागरिक दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही 
       दिनांक 16/02/2023 रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या कुशल बुद्धी ने अनेकांना चावा घेणारा पिसाळलेला लंगुर प्रजा तिचा माकडस वनविभागाच्या सर्व टीम ने साठे नगर येथे दाखल होऊन त्या पिसाळलेल्या माकडाला जेर बंद केले या माकडाने परतुर मध्ये दहशितेचे वात वरण निर्माण केले होते आता परतूर करांनी दिलासा मिळाला असुन सर्व वन विभाग अधिकाऱ्याचे शहरातील नागरिकांनी मनापासून आभार मनले आहे 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत