सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, जगभरात छत्रपती शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,जितेंद्र आव्हाड यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का? - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना सवाल


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते शिवरायांच्या व्यतिरिक्त रयतेचे राजे असे इतर कोणत्याही राजाला संबोधल्या गेले नाही असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ते वारंवार शिवरायांचा अपमान करणारी वक्तव्य करत असून शिवप्रेमी जनता त्यांना बदडून काढेल अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड वारंवार हेतूपुरस्सर व जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असून औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजल खान यांचे उदात्तीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत, जितेंद्र आव्हाड हा मूर्खपणा वारंवार करत आहेत परंतु शिवरायांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या १०० पिढ्या यामुळे बरबाद होतील अशा शब्दात माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना फटकारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार औरंगजेब शाहिस्तेखान अफजलखान यासारख्या स्वराज्य दोन्ही व महाराष्ट्र द्रोही असणाऱ्यांचे उदातीकरण केले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते औरंगजेब हा क्रूरकर्मा नसून सूफी संत होता तर अफजल खान हा शिवरायांना मारण्यासाठी आला नव्हता अशा प्रकारची मुक्ताफळे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांकडून उधळली जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार अशा प्रकारची शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी वक्तव्य केले जात असून या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब, शाहिस्तेखान, अफजल खान हे अधिक चांगले होते असे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका बनत चाललेली आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडतो आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले

जितेंद्र आव्हाड शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य वारंवार करत असून स्वराज्यद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजलखान सारख्या क्रूरकर्म्यांची उदातीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही याचाच अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का असा सवाल देखील माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना विचारला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत