सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पाटोदा येथे समर्थ विद्यालयात प्रेरणा सत्र संपन्न.

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेरक व तज्ञ मार्गदर्शक श्री देविदास आठवे सर यांनी विद्यार्थ्यांना विवीध ऊदाहरणे देवुन अभ्यास कसा करावा - स्पर्धा परिक्षेची तयारी - वाचन - लेखन - चिंतन -मनन या विषयी प्रेरणादाई असे मार्गदर्शन केले.
    बाल वयातच आपले ध्येय निश्चित करुन ध्येयाच्या पुर्ततेसाठी कठोर मेहणत करण्याची तयारी प्रत्येक विद्यार्थ्यांने मनात बाळगली पाहीजे.असे प्रतिपादन केले.
चांगल्या सवयी आपणास ध्येयापर्यत पोहचण्यास मदत करतात.तेव्हा प्रत्येकाने मोबाईल , टि.व्ही. चा आवश्यक तेवढाच वापर करावा असे आग्रही प्रतिपादन केले.
दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनी मुख्य मार्गदर्शक श्री देवीदास आठवे यांचे शाल पुष्पहार घालुन स्वागत केले. 
     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधे प्रचंड क्षमता असते त्या क्षमतेचा ऊपयोग करुण प्रत्येकाने मोठे यश मिळवावे व त्या साठी प्रेरणा मिळावी म्हणुन या ऊपक्रमाचे आयोजण करण्यात आल्याचे सांगितले .
    प्रास्ताविक श्री पाराजी रोकडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाचे सहशिक्षक सर्वश्री गाडेकर , ऊध्दव खवल , , कुळकर्णी , जोशी , खवल चत्रभुज , डवरे , वखरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी ऊपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत