सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पोहरागड (पोहरादेवी) येथे बंजारा जनजागृती महा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा - अर्जून नायक

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथे दि. २९ मार्च रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती महा मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले आहे, तरी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेड मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांनी केले आहे. 
     या जनजागृती महा मेळाव्याला धर्मगुरु बाबुसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, महंत सुनिल महाराज, महंत रमेश महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज, देवी - बापू भक्त महंत शेखर महाराज, महंत खुशाल महाराज यांच्यासह भारतभरातून येणाऱ्या संत महंत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महामेळाव्याला बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत. 
        मागील अनेक वर्षापासून देश पातळीवरील अनेक समस्यांना बंजारा समाज तोंड देत असून त्याकडे कोणतेही शासन प्रशासन लक्ष द्यायला नसल्याने आता देशपातळीवर सामाजिक एकजुटीचा निर्णय घेण्याची वेळ आलेली असल्याने, भारतातील 15 ते 20 बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी असलेल्या पोहरादेवी (पोहरागड) येथे राष्ट्रव्यापी अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी 13 ते 14 राज्यातील लोकांची उपस्थिती राहणार आहे, तरी या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने महा मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत