सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

कृषी बाजार समिती निवडणूक युवा ने लढवावी - सचिन खरात (ता.अध्यक्ष शिवसंग्राम)


 परतुर । प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
        परतुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आता युवा शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी अन् सुलतानी दोन्ही संकटे ओढवत असताना शेतकरी पुत्रांनी हक्काच्या कृषी बाजार समिती व शेतकरी हित चळवळ उभा करावी परतुर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या बाबत समाधानकारक असे काहीच काम होत नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी आता शेतकरी युवा पुत्रांनी पुढाकार घेतला असून शेतकरी कृषी बाजार समितीची निवडणूक लढवावे असे आव्हान शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी केले. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. या ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हंटले आहे. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. यावेळी बदल होणं आवश्यक आहे.या कृषी बाजार समिती ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे सचिन खरात यांनी म्हंटले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत