सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
  तळणी महात्मा फुले सा. वाचनालय तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित गावचे सरपंच गौतम सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सरकटे, जयदेव मुर्तडकर,कृष्णा सरकटे, कृष्णा वाघमोडे, ज्ञानेश्वर काजळे,नंदु सरकटे माविम चे लेखापाल सतिश सरकटे व वाचक वर्ग. मोठया प्रमाणात उपस्थीत होता
    या जयंती निमीत्य सरपंच सदावर्ते यानी मनोगत व्यक्त करताना सागीतले आपल्या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात कर्तृत्वाने मोठी असणारे माणसे जन्माला आली आपल्या पिढीसाठी त्या काळी त्याचा मोठा सघर्ष केला म्हणून ईतिहासाने त्याची नोद घेतली फुले दाम्पत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य एक आदर्श घेणारे आहे .सद्य स्थीतीत कुठल्याही संताना राष्ट्रपूरुषाना जाती पूरते बघण्याची सकूंचीत प्रवूती वाढत चालली असली तरी त्या महापूरुषाचा तो काळ जातीपूरता नसल्याने त्याचे कार्य कधीही नजरेआड होऊ शकत नाही महापूरुषांचा आदर्शच घ्यायचा असेल तर त्यानी केलेला त्याग व त्याचे विचार आत्मसात करावी लागतील महापूरुषानी सगळ्यांचा विचार करुनच ती जगली आहेत त्याचा समर्पण भाव आजच्या पिढीसाठी एक मोठा आदर्श असुन तो आदर्श प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सरपचं गौतम सदावर्ते यांनी सागीतले या क्रार्यक्रमाचे प्रास्तावीक सुधाकर सरकटे यानी केले तर आभार प्रदर्शन माधवराव सरकटे यानी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत