सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बुद्धभूषण मित्र मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती निमित्त अन्नदान



परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    येथील बुद्धभूषण मित्र मंडळाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महादेव मंदिर चौक येथे अन्नदान करण्यात आले. परतुर शहरासह तसेच तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच विविध नेते मंडळी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये सहभाग घेतला होता. बुद्धभूषण मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल पहाडे हे दरवर्षी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान करत आले आहे. तसेच यापुढेही आपण हे सामाजिक कार्य चालू ठेवणार आहे असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी स्वप्निल पहाडे, तुषार पहाडे, अमोल पहाडे, सुनील पहाडे, रवि घोडे, सतीश पहाडे, राहुल पहाडे, आकाश पहाडे, निलेश पहाडे, अनिल पहाडे, कृष्णा वाघमारे, अनिकेत सोनपसारे, रूपेश पहाडे, संकेत सोनपसारे, सूरज पहाडे, आदर्श सोनपसारे, अजय निकाळजे, विकास पहाडे, बाला पहाडे, इंद्रजीत गायकवाड, अमरदीप सुतार, अमोल नाथभजन, गौतम प्रधान, अनिल जहार, दत्ता एक्कीलवाले, परमेश्वर बिल्लारे, सागर काजळे, पपु घायताड़क, इरफान शेख, भगवान साळवे, विशाल भादर्गे, किरण प्रधान, मिलिंद गायकवाड, अभि सुतार, प्रकाश प्रधान, विजय नाथभजन, विशाल साळवे, दिपक एक्कीलवाले, सागर पहाडे, पवन निकाळजे, वैभव डुकरे, साई मुपडे, दिपक नाथभजन, दत्ता लोखंडे, अरुण पवार, शिव पवार सह आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत