सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

तळणी प्रतिनिधी (रवी पाटील)
तळणी येथील दोन गरजूंना आज ग्रामपचायत सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यानी आर्थीक मदत केली दोनही कुंटूबं अत्यंत गरीब असून त्याना समाजाच्या मदतीचा आधार होणे गरजेचे आहे माणूसकीच्या नात्यातून व त्याची आर्थीक दुर्बलता यामुळे बघून अशा गरजूना समाजाच्या माध्यमातून मदत होण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेऊन एक माणूसकी जपण्याचा नविन पांयडा सुरू केला असल्याने व त्यानी केलेल्या मदतीमुळे ते कौतूकास पाञ आहेत 
गावातील एक गरीब कुटुब महादेव गुडघे अत्यंत कष्ट या कुटुबांन सोसले महादेवराव याचे दोन तिन वर्षा पूर्वीच निधन झाले दोन मुल मुलीची जबाबदारी आईकडे आली त्याना दोन मुली एकीचे लग्न झाले तर दुसर्या मुलीचे लग्न काही दिवसावर येऊन ठेपले असल्याने आर्थीक जुळवाजुळव सुरु झाली सामाजीक कार्यात अग्रेसर असणारा पांडूं अण्णा व गौतम सदावर्ते सरपंच जेव्हा हा विषय कळाला की लगेच त्या कुटुंबासाठी आर्थीक मदत उपलब्घ करून दिली 

दुसरे कुटूबं दताञय पारसकर यांचे स्वःत गंवडी काम करणारा दताञयला काम करत असतानाच अर्धागवायूचा तीव्र झटका आल्याने त्याचा एक हात व एक पाय पूर्णपणे निकामी झाली स्वःत जवळचे काही व ऊसण वारी करून त्यानी औषध उपचार केले थोडेफार बर वाटले की गावातील मोकाट जनावरे अंगावर येतात की काय याच्या भितीने तो पडला कंबरेचे हाड मोडले डॉक्टरानी औपरेशन सांगितले . खर्च ही मोठा होणार या भीतीन तो दोन महीन्यापासून जाग्यावर पडून आहे काल या दोघांनी त्या कुंटुंबाला ही मदत केली समाजात अनेक दानशूर आहेत त्यानी अशा गरजूना मदत करणे गरजेच आहे

गावातील या दोन कुंटूबाची परीस्थीती खूप गरीबीची आहे त्याना मदतीची गरज आहे अशा गरजुनां मदत केल्यावर एक वेगळेच समाधान प्राप्त होते गरज आहे आपल्या दानशूर वृतीची अनेकांनी या कृटुंबाना मदत करावी असे आवाहन सरपंच गौतम सदावर्त व पांडू अण्णा जनक वार यांनी केले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत