सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे -गजानन इगळे

परतूर दि.28 प्रतिनिधी कैलाश चव्हाण
बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे असल्याचे मत दि.27 रोजी परतूर तालुक्यातील आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात भाग दोन व चार येथे आयोजित बालविवाह प्रतिबंध व किशोरी मेळाव्यात बाल संरक्षण जिल्हा अधिकारी गजानन इंगळे यांनी व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती डॉ. स्मिता रोडगे, श्रीमती आशा मगरे, मुख्यध्यापिका ज्योती साळवे, श्रीमती मंगल खवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या वेळी पुढे बोलताना श्री. इंगळे म्हणाले की, बालविवाह ही समाजाला लागलेली कीड आहे आणि हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा बालविवाह होत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवावे असे सांगितले. या वेळी मुलींनी बालविवाह प्रति वेगवेगळी नाटिका सादर करत प्रभात फेरी काढली. या वेळी श्रीमती संगीता गोरे, श्रीमती राज्यश्री जाधव, श्रीमती दीपा नारायनकर, श्रीमती शीतल कुलकर्णी, श्रीमती सुकुमारी गोरे आदी शिक्षिका उपस्तीत होत्या.
फोटो ओळी- आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी माहिती सांगताना गजानन इंगळे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत