सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पाटोदा येथे श्री समर्थ विद्यालयात नागपंचमी निमीत्त प्रदर्शन.

परतुर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ] श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात नागपंचमी चे निमित्ताने विवीध जातींच्या सर्पाचे छायाचित्राचे प्रदर्न आयोजीत करण्यात आले होते.
   आपले प्रत्येक सण व ऊत्सव हे वैज्ञानिक दृष्ट्या परीपुर्ण आहेत. आपण त्या मागील कारण मिमांसा समजुन घेतली पाहीजे. 
नागपंचमी चे दिवशी देशाभर नागदेवतेची पुजा करण्यात येते .
सापांबद्दल असलेले गैरसमज दुर व्हावेत या साठीच विद्यालयात चित्रमय माहीतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
   महाराष्ट्रात आढळुन येणारे बहुतेक साप हे बिनविषारी आहेत. साप हा शेतकर्यांचा मित्र असुन सापांना शक्यतो ठार मारु नये. 
विद्यालयाचे शिक्षक श्री चत्रभुज खवल यांनी प्रत्येक सापाची जात त्याचा आढळ ई. लक्षणे विद्यार्थ्यांना समजुन सांगितली.
   मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी संकलीत केलेल्या माहीतीवर आधारीत या चित्रप्रदर्शनीला विद्यार्थ्यांनी खुप मोठा प्रतीसाद दिला.
साप चावल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार या वेळी समजुन सांगण्यात आले.
प्रदर्शन यशस्वीतासाठी विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंदांनी परीश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत