सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जालना जिल्हा मध्य गोरसेनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन



परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
  जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा येथे गोर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.. विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील होत असलेली बोगस राजपूत भामटा परदेशी,मीना, छप्परबंद, समाजाशी घुसखोरी थांबविण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी चौकशी पूर्ववत लागू झाली पाहिजे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले.. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले असल्याचे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी सांगितले.
 मागील अनेक वर्षापासून विमुक्त जाती (अ )प्रवर्गामध्ये अवैधरित्या व संवैधानिक मार्गाने जात वैधता प्रमाणपत्र मिळवणारे राजपूत ,परदेशी, मीना व छप्परबंद लोकांनी फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे त्यामुळे मूळ विमुक्त जाती अ प्रवर्गातील लोकांचे आरक्षण संपूर्णतः धोक्यात आलेले आहेत त्यामुळे विमुक्त जाती-अ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच या प्रयोगातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अन्याय सहन करावा लागत आहे.
ही समस्या सोडविण्यासाठी गोरसेनेच्या वतीने २०१९ पासून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने केल्या गेलीत, तसेच सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषदेचे आमदार माननीय राजेश राठोड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला असताना शिंदे फडणवीस व अजित पवार सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी SIT नेमणूक करण्याचे आश्वासन दिलेले असताना पुन्हा काल ३ ऑगस्ट रोजी SIT चौकशी रद्द करण्यात येत आहे असे सांगितले गेले. त्यामुळे ही SIT कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये म्हणून गोरसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. निवेदनावर
जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड,जिल्हा संघटक गोविंद राठोड, तालुकाध्यक्ष संदीप जाधव, अजय राठोड,अर्जुन राठोड, यांच्या सह्या आहेत.
     तसेच राजपूत भामटा प्रकरण विधानसभेत का उपस्थित केला म्हणून देविचंद बारवाल यांच्या वर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावे आशयाचे एक नीवेदन  गोर सेना च्या वतीने आष्टी पो स्टेशन येथे  देण्यात आले या वेळी
   गोर सेना शहर अध्यक्ष संजय चव्हाण , सरपंच निरदास राठोड़ सरपंच सिताराम राठोड़ ज्ञानेश्वर पवार अर्जून राठोड़ नायक अंकुश आड़े बालाजी आडे भारत चव्हाण अविनाश राठोड़ योगेश आड़े शिवनारायण राठोड़ संजय राठोड़ नवनाथ आठे प्रधान राठोड़ विलास राठोड़ के के राठोड़ भाऊ साहेब आडे राहुल राठोड़ मारोती राठोड़ नवनाथ राठोड़ विकास राठोड़ आदी उपस्थीत होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत