सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात भाजपा युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न,पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात देशाची वाटचाल महासत्तेकडे - आमदार बबनराव लोणीकर


जालना/प्रतिनिधी समाधान खरात
पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत अवघ्या विश्वात देशाला आदराचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा आज वाढदिवस. त्यांनी देशाला खऱ्या अर्थाने जगभरात सन्मानाने उभे केले, सामान्य भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. या कर्तृत्ववान जागतिक नेत्यासाठी ‘जीवेत शरद: शतम्’ हीच भावना मनात दाटून आली आहे.
   मोदींना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक वेगवान होवो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! करतो असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करीत हिंदूराष्ट्रला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्यासाठी संकल्पबद्ध असलेले राष्ट्रनायक, सशक्त भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्म दीना निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा जालना तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी ह भ प रमेश महाराज वाघ वीरेंद्र धोका अशोक पवार नारायण पवार, प्रा नारायण बोराडे , प्रा अशोकराव देशमुख, प्रा दिगंबर खेडेकर, प्रा गरड सर रणजित मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप भाई हिवराळे,सुशील ढोले, जिल्हा चिटणीस अनिल चव्हाण, शहर महामंत्री विनोद दळवी, शहर उपाध्यक्ष जितू मुटकुळे, राहुल पळसपगार, सय्यद इम्रान , तालुका उपाध्यक्ष विजुराज पवार, ऍड किरण काकडे, ऍड सुनील काळे, पांडुरंग जरहाड पाटील, प्रवीण एकुंडे, वैभव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आज 47 तरुणांनी रक्तदान केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत