सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पिंप्रूळा येथील पुकारलेले उपोषण नितीन जेथलियांच्या उपस्तिथीत सोडले आरक्षण मिळेपर्यन्त साखळी पद्धतीने अंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार


परतुर - प्रतिनीधी कैलाश चव्हाण 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी करत गेल्या चार दिवसापांसुन तालुक्यातील पिप्रुंळा येथे पांडुरंग गाडगे, नाना आवटे, नंदकिशोर आवटे या मराठा युवकांनी पुकारलेले अमरण उपोषण काँग्रेसचे युवानेते नितीनकुमार जेथलिया यांच्या हस्ते आज दिनांक 14 सप्टेबंर रोजी सोडण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट , आष्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक नरके साहेब, बाबुरावजी हिवाळे, शाकेर भाई यांची प्रमुख उपस्तीथी होती. 
   मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासणानंतर सराटी अंतरवाली येथे आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पा.यांनी मागे घेण्याच्या निर्णयानंतर नितीनकुमार जेथलिया यांच्या मध्यस्तीने पिप्रुंळा येथील अन्नत्याग अंदोलन मागे घेत साखळी पद्धतीव्दारे अंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी नितीनकुमार जेथलिया यांनी म्हटले की उपोषण लक्ष वेधण्यासाठी असते हे खरे असले तरी स्वतःला त्रास देउन न्याय मागण्यापेक्षा लोकशाही पध्दतीने कडव्या अंदोलनातुन सरकारचे लक्ष वेधावे. तरूणानी आत्महत्या करू नये तर आपल्या न्याय हक्कासाठी जनआंदोलनातून आपला अधीकार मागावा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आरक्षणाबाबत अनेकांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला हे अत्यंत चुकीचे असुन यामुळे त्या संबधीत व्यक्तीचा परिवार उध्वस्त होतो. म्हणुन आजच्या तरूणांनी आत्महत्येचा विचार करू नये. सर्व मराठा समाज एकवटल्याने आता सरकारही बिधरले असुन मराठा आरक्षणाबाबत शासकीय पातळीवर हालचाली चालु झाल्या असल्याची माहिती मिळत असून कोणत्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सुुरवातीपासुनची काँग्रेस पक्षाची भुमिका असल्याचे ते म्हणाले. तरूणांनी लोकशाही पध्दतीने आपला न्याय मागावा व कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवु नये , शहनिशा करूण आपली पुढील भुमिका ठरवावी व कायदा हातात हेऊ नये असे आव्हान त्यांनी यावेळी केले. यावेळी मोठयासंखेने मराठा बांधवांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत