सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विष्णू कदम यांना जाहीर

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  शासनाच्या वतीने दिल्या जाणारा 2022/23 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जालना जिल्हा परिषदेच्या वतीने श्री विष्णू कदम यांना जाहीर झाला आहे शैक्षणिक आणि सामाजिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा परतूर यांच्या वतीने सदर निवड बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
   या निवडीबद्दल माजी मंत्री तथा विद्यमान आमदार श्री बबनराव लोणीकर साहेब, युवा भाजपा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष बाबुरावजी पवार सर, परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष भगवान जायभाये, जिल्हाध्यक्ष मंगेश जैवळ, तालुका अध्यक्ष दिलीप मगर,जिल्हा नेते कल्याण बागल,विष्णू तोटे,रंगनाथ रोकडे,रामेश्वर हातकडके,विष्णुपंत ढवळे,प्रकाशकाका ढवळे व राम सोळंके यासह सर्व शिक्षक बांधवांकडून अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत