सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समर्थ विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन.

परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ]. ता.परतुर. येथील श्रीसमर्थ माध्यमिक विद्यालयात वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या पाल्याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष देवुन त्यांच्या ऊज्वल भविष्यासाठी शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी केले.
     पुढे बोलतांना ते म्हणाले की , प्रत्येक विद्यार्थी हा कुटूंबाचे व राष्ट्राचे भविष्य घडवत असतो. कष्टाने व जिद्दीने अभ्यास करुन प्रत्येक परीक्षेत यश संपादन करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते.
 मोबाईल - दुरचित्रवाहीण्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधे मोठा अडथळा निर्माण करीत आहेत म्हणुन पालकांनी आपल्या पाल्यास गरज असल्यासच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी असे आवाहन केले.
आपल्या शाळेत शिकणारी सर्वच विद्यार्थी हे कष्टकरी शेतकर्यांची आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमधे खुप मोठी ऊर्जा असते त्या ऊर्जेला सकारात्मकतेकडे घेवुन जाण्याची प्रेरणा शाळेतुन शिक्षक मंडळी देत असतात. पलकांनिही वेळोवेळी शाळेत भेट देवुन आपल्या पाल्याची प्रगती तपासुन घेण्याचे आवाहन करण्यात आले.
भारतमातेच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील शिक्षणप्रेमी नागरीक व पालक श्री नारायणराव खवल हे होते.
 प्रास्ताविक श्री ऊध्दव खवल तर सुत्रसंचालन श्री रोकडे पाराजी यांनी केले. श्री विद्यानंद सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मोठ्यासंख्येने पालक ऊपस्थीत होते. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतिसाठी शिक्षकांशी सुसंवाद साधला.
यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.समर्थ विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन. 
-----------------------------------

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत