सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अपघाती विमा योजना धावपळीच्या युगात कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज -- मुख्य प्रबंधक अतुल सावजी.,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून वारसाना दोन लाख रुपये विमा मंजूर



परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याचे जीवन अनमोल असतांना आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षासाठी कुटुंबाला संरक्षणसाठी अपघाती विमा ही काळजी गरज आहे. प्रत्येकाने आपला विमा काढून घ्यावा असे आवाहन स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले.
ते प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून वारसाना दोन लाख रुपये विमा मजूर झाल्यानंतर धनादेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी एसबीआय बँकेचे उपप्रबंधक मनोहर गावडे, सेवा व्यवस्थापक इम्रान पठाण, प्रवीण दुधाट, अमित राहंदले, अभिषेक वैष्णव, भारत सवने यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य प्रबंधक अतुल सावजी बोलताना म्हणाले की केंद्र शासनाच्या विमा योजनेत भारतीय स्टेट बँकेच्या प्रत्येक ग्राहकाने स्वत काळाची गरज ओळखून विमा घेणे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा वीमा योजनांमध्ये अतिशय अल्प दरात वीमा काढून आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे. तसेच उतरत्या वयाच्या काळात शासनाची अटल पेन्शन पाच हजार रुपये पर्यंत दरमहा पेन्शन योजनात सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी श्री अतुल सावजी यांनी केले.
परतूर येथील पत्रकार कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा ऑगस्ट महिन्यात निधन झाले. त्यांचा परतूर व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या पुढाकारातून भारतीय स्टेट बँकचा प्रधानमंत्री सुरक्षा, व प्रधानमंत्री जीवन ज्योति सुरक्षा विमा योजनेत विमा उतरविला होता. अचानक त्यांच्यावर ऑगस्ट महिन्यात काळाचा आघात झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी परतूर व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भारत सवने यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करीत मयत कृष्णा धोंगडे यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेतून चार लाख रुपये मिळणार आहे. त्यापैकि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून दोन लाख रुपये प्राप्त झाले आहे. त्याचा धनादेश स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांच्या हस्ते मंगळवारी वितरित करण्यात आला. यावेळी एसबीआय बँकेचे कर्मचारी ग्राहक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत