सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मेन रोड वरील अतिक्रम स्वःता काढून घ्यावे -मुख्यधीकारी अभीषेक परदेशी

 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
आज परतूर शहरात मेन रोडची नगर परिषद चे मुख्यधीकारी अभिषेक परदशी यांनी पाहानी केली यावेळी त्यांनी व्यापाऱ्या ना सुचना केल्या की जर कोणाचे अतिक्रमण असतील तर त्यांनी स्वःताहून काढून घ्यावे
   परतूर शहरात मेन रोड राजू मुंदडा यांच्या पानपट्टी पासून पुढील रस्ता राहीलेला असून या राहीलेल्या रस्त्याची पाहनी केली व व्यापाऱ्याना सुचना केल्या की येत्या 29 की डींसेबर रोजी शहरातील या राहीलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घघाटन आमदार बबनराव लोणीकर हे करणार असून हया रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण असतील,रोड वर काही पाट्या असतील,काही साहित्य असतील तर ते तातडीने स्वतःहून काढून घ्यावे नसता न.प.अतीक्रमण काढेल व रस्त्यावरील साहित्य जप्त करील असे शेवटी सुचना देताना न.प. मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांनी दिल्या 
   यावेळी त्याच्या सोबत अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी तसेच फायरमन अनील पारीख, स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे,सुरेश अर्सुल ,आदी होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत