सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
    आज आनंद इंग्लीश स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गीतगायन स्पर्धा घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
   याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, एकनाथ कदम सर व प्राचार्य नारायण सागुते ,श्रीमती दिपाली हरजुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.  
          कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ कदम सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगातून सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करून दिली व त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेच असे सांगितले.तसेच प्राचार्य नारायण सागुते यांनी गाण्यातुन सावित्रीबाईच्या विचारावर प्रकाश टाकला.
  विद्यार्थ्यांनी अनेक समाजसुधारकांच्या जीवन चरित्रावर, देशभक्तिपर गीते, कविता सादर केल्या,आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास काळे यांनी केले.
याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत