सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

न्यू .वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानन्द यांची जयंती साजरी .

 परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
दि १२/०१/२०२४ शुक्रवार रोजी न्यू . वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या वेळी संस्थेच अध्यक्ष  नारायणराव सोळंके , कार्याध्यक्ष  गणेशराव सोळंके , सचिव सौ छाया बागल मॅडम सौ अश्विनी मोरे मॅडम व  सुरेश मोठे  उपस्थीत होते
    प्रमुख अतिथि म्हणून जाधव सर, भानूसे सर, निवृत्ती बिडवे सर आणि प्रिन्सिपल साम वर्घिस सर होते.  
       यावेळी राजमाता जिजाऊ बद्दल बोलताना मोरे मॅडम म्हणाल्या की, जिजामाता म्हणजे जगातील सर्व मातांसाठी एक आदर्श आहेत. त्या केवळ उत्कृष्ट माताच नाही तर उत्कृष्ट पत्नी, राजकारणी आणि अर्थतज्ञ सुध्दा होत्या. तसेच यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल बोलताना श्री मोठे सर म्हणाले कि, स्वामी विवेकानंद हे सर्व भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर होते स्वामीजींनी भारताच्या संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला पटवून दिली तसेच साता समुद्रापार भारताचे नावलौकिक केले. या कार्यक्रमाचा समारोप श्री निवृत्ती बिडवे सर यांनी जिजाऊ वंदना गाउन केला. 
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोविंद पाठक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हरकळ सर यांनी केले या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत