सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

नवीन शैक्षणिक धोरणात सृजनशीलतेला महत्त्व : प्रा.डॉ. भालचंद्र वायकर

  परतूर , प्रतिनिधी  कैलाश चव्हाण 
                   नवीन शैक्षणिक धोरण विदयार्थांच्या सर्वांगीण हिताचे असून , त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळया गुणांचा विकास करून आवडीच्या विषयात संधी व त्यांच्या मध्ये असलेल्या सृजनशीलतेला महत्त्व दिले गेले आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ. भालचंद्र वायकर अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विदयाशाखा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ छ. संभाजीनगर यांनी केले .
             येथील लालबहादूर शास्त्री महाविदयालयात दि. 25 जानेवारी ला घेण्यात आलेल्या एक दिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चर्चासत्रात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारत खंदारे यांची उपस्थिती होती. या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा.डॉ. विलास खंदारे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ. दिलीप अर्जुने, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन,डॉ. कैलाश पाथ्रीकर , उपप्राचार्य डॉ.रवी प्रधान,प्रा. जालिदर इघारे,डॉ. शैलेंद्र शेलार , डॉ.राजेंद्र फासे ,प्रा. अनिल सोनपावले , कार्यालयीन अधीक्षक सुधाकर काटे याची उपस्थिती होती .
                पुढे बोलतांना डॉ. वायकर म्हणाले , प्राध्यापकांना विदयार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्याला ओळखता आले पाहिजे. तरच त्या विद्यार्थाला न्याय मिळेल . त्यासाठी प्राध्यापकांनी सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून स्वतःमध्ये बदल केले पाहिजे . बदल हा निसर्गाचा नियम आहे .बदलाचा स्वीकार आपण केला पाहिजे.प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांनी नवीन शैक्षणिक धोरणात रोजगारांच्या संधी आणि युवकांचा विकास यावर आपले विचार व्यक्त केले .
             कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.रवी प्रधान यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सखाराम टकले यांनी केले. आभार डॉ.राजेंद्र फासे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक , विदयार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शहरातील शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्तीची उपस्थिती लक्षणीय होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत