सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दि जालना पीपल्स बँक निवडणूक ,सचिन सांबरे यांचा विकासकुमार बागडी यांना जाहीर पाठींबा


जालना प्रतीनिधी समाधान खरात 
  जालना पीपल्स बँकेच्या निवडणुकीत आता कुठे रंगत येऊ लागली आहे. या निवडणूकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे. दरम्यान, अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार विकासकुमार बागडी यांना सचिन रुपचंद सांबरे यांनी जाहीर पाठींबा दर्शविला आहे. 
   यावेळी खाटीक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मनोज बागडे, भुषण सांबरे, पांडुरंग शिंदे, अनिल लष्कर, कैलास गायकवाड, रवि सांबरे आदींसह असंख्य लोक व मतदार उपस्थित होते.
 सांबरे यांनी केवळ पाठींबाच दर्शविला नाही तर ते आता विकासकुमार बागडी यांचा प्रचार देखील करणार असून त्यांच्या विजयासाठी आपण आपल्या जीवाचे रान करु, अशी ग्वाही  सांबरे यांनी दिली आहे.
जालना पीपल्स बँक ही व्यापार्‍यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांची कामे व्हायला पाहिजेत म्हणूनच आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे श्री. विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत